शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कळत नाही आज का,
मन माझे भरून येत आहे,
सारे सोबत असूनही का,
एकटेपणाची जाणीव होत आहे.....

खर्च मी इतका वाईट आहे का, मित्रानो काय गुण्हा झाला माझा फक्त मि प्रेमच केल ना मंग

माझे आपलेच मला दु:ख देत आहे,
आपलेपणाचा खोत आव आणून,
विरहाच्या दरीत ढकलत आहे.....


असा काय गुन्हा झाला माझा,
कि पावलोपावली दुखच माझ्या वाटेला येत आहे,
खर्च मी इतका कठोर आहे का,
कि सगळेच दगडासारखे मला ओरबाडत आहेत.....

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा,
कि अपेक्षा पूर्ण न होताच भंग पावत आहे,
कुणावर ठेऊ मी विश्वास कुणाला म्हणू मी आपले, जे माझे जवळचेच मला येकटा टाकुन गेले
सगळेच वेळे नुसार बदलत जात आहेत....

तुच सांग रे देवा
कसा जगू मी या निष्ठुर जगात,
कि मि न केलेल्या पापाचीच शिक्षा

 मला मिळत आहे,
अजून किती सोसू हृदयावर घाव मी,
कि एक जखम मिटताच नवीन जखम का सारखी मलाच मिळत आहे......

अजून किती रे परीक्षा घेशील रे देव माझी,
एक तरी स्वप्न कर रे पुरे माझे
कि सारीच स्वप्ने माझी अधुरी राहनार आहेत

थोडी तरी कर रे कदर माझी,
का मला आसेच वार्यावर सोडल आहेस
आता तरी कर रे कदर माझी
कारण
हळू हळू श्वास माझे मिटत आहेत....
हळू हळू श्वास माझे मिटत आहेत....


किसन गावडे तिंगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा