सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

मराठी कविता 15

माराठी कविता
1
तू असतीस तर,
मला रडावं लागलं नसतं,
तू असतीस तर,
माझं घरटं तुटलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं मन कासाविस झालं नसतं,
तू असतीस तर,
माझं हसू चोरी गेलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं जग लुटलं नसतं,
तू असतीस तर,
माझं स्वप्न भंग पावलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं ह्रदय तडकलं नसतं,
तू असतीस तर,
माझं दुःख चव्हाट्यावर मांडलं नसतं.....
तू असतीस तर,
माझं सुख हिरावलं नसतं,
तू असतीस तर,
माझं आयुष्य संपलं नसतं.....

2
तुला काहितरी बोलावेस वाटत मला.......
तु खूप छान दिसतेसं
असं तुला म्हणावेस वाटत मला........
अंगावर पाऊसाच्या पाण्याचा
वर्षाव झाल्यासारखं तु हसतेसं...
आणि,
आईसक्रिम खायाला नाही मिळालेल्या
लहान मुलीसारखं तु रुसतेस...
तुझ्या सहवासात राहवेसं वाटत मला.....
तुझा स्वभाव छान आहे
असं तुला म्हणावेसं वाटत मला........
दुर्मिळ भागातुन वाहणा-या
शितल सरितेसारख तु शांत राहतेसं....
आणि,
कोकिळेच्या मुखातुन निघणा-या
गोड आवाजासारखे तु बोलतेस....
तुझ्या दुनियेत यावेसं वाटत मला......
माझ तुझ्यावरच प्रेम आहे
असं तुला म्हणावस वाटत मला.....
समुद्रामधील शिँपल्यातील
मोत्यासारखं तुला माझ्या हदयात ठेवावेसं वाटत मला......
आणि,
माझ्या शेवटच्या श्वासापर्यत
 तुला जिवनभर साथ दयावेसं वाटत मला.......
3
नको रे नको मना
प्रेमात पाडू तु पुन्हा या मना

प्रेम करने होईल हा गुन्हा
आणून सोडेल वादळात पुन्हा

झाला होता एकदा तोच गुन्हा
नाही करायचा तोच पुन्हा

प्रेमात पडून करतो मना आपणच गुन्हा
म्हणतो नंतर स्वतःच सावर रे मना पुन्हा

पटणारा नसतो काहींना आपला प्रेम हा गुन्हा
दुर लोटतील दोघांनाही एकमेकांपासून पुन्हा

भावभावकीत मांडला जाईल प्रेम हा गुन्हा
बदनामी चारचौघात मायबापाची पुन्हा

नकोच नको करायला हा गुन्हा
सोसवणार नाही हे सर्व पुन्हा

नको रे नको मना
 . . नको रे नको मना .
4
अखेरच्या क्षणापर्यंत
=============================
कधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची
अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडेपर्यंत
मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे
तुझ्या बंदिस्त मनापर्यंत

अर्थात तुझ्या दिसण्याला कधी भुललो नाही
पण तुझ्या वागण्यानं तू पोहचलीस काळजापर्यंत
मला भुलावणहि काही सोप्पं नव्हतच मुळी
पण तुझ्या प्रत्येक अदेन छेडलं घायाळ होईपर्यंत

तुझं निरागस हसणं तुझं निरागस असणं
हळूहळू मनात घर करत गेलं
अन तुझ्या मनाचा गंध पसरत गेला
माझ्या मनाच्या नसा नसापर्यंत

ते ओझरते स्पर्श तो वाढत गेलेला विश्वास
मला गुरफटत गेला तुझ्यामध्ये
तू अबोल राहूनही नजरेनच तुझ बोलणं
सारं काही भिडत गेलं माझ्या हृदयापर्यंत

कधी माझं मी पण गळालं नाही कळलं
माझ्या मनासकट तू मला वेढून घेतलं
आता तुझच आस्तित्व घेऊन जगतो मी
तुझच प्रेम राहिलं माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत
5
उत्तर एकाचे तरी देशील का ?

जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?

जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही
तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?

उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,

उत्तर एकाचे तरी देशील का ?

6
एकदा तरी नझर टाक
एकदा तरी चोरून बघ
एकदा तरी शिरून डोळ्यांत
ह्रुदयात माझ्या उतरून बघ

एकदातरी साद घाल
एकदा तरी हाक मार
एकदा तरी माझ्यासाठी
वेळ तुझा घालवून बघ

एकदातरी वाट पहा
एकदातरी वेळ वाहा
एकदातरी माझ्यासाठी
येर्याझार्या घालून बघ

एकदातरी स्पर्श कर
एकदातरी मिठीत धर
एकदातरी माझ्यावर
चुम्बनांचा वर्षाव कर

एकदातरी जागी हो
एकदातरी माझी हो
एकदातरी माझ्यासाठी
सर्वस्वाचे दान कर...
सर्वस्वाचे दान कर...

7
ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......

नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन......

8
तिला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले
होते......
तिने नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले
होते......
झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...
आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...
राख़ अजूनही गरम होती
 उद्या वाहू म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....
मग भल्या पहाटे कुणीतरी
तिच्या स्पर्शासम उब देत होतं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...
आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...
नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी...
नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...........
माझ्या प्रियेची...........

9
अखेरची आठवण घे माझी
यापुढे मनात तुझ्या
माझ येणे जाणे असणार नाही...

यापुढे माझ्या आठवणींचं चांदणं
तुझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही माझ्या आठवणींचा पाऊस
तुझ्या मनाच्या अंगणात बेधुंद बरसनार नाही....!

माझा हळवेपना मीठीतला प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसच माझ मरणही स्विकारुन घे...!

हे अखेरचे माझे  काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी...
पण यापुढे माझ्या आसवांच्या धारा
वाहणार नाहीत...

काही करु नको
उग रडू नको
होती एक वेडी
वेड तिच प्रेम
वाटल तर आठवनीत ठेव
नाही तर अस्थि सोबत वाहून
जाऊ दे

या जन्मी तरी सुख प्रेम नाही भेटल
कदाचित पुढच्या जन्मी
तरी थोड़ प्रेम थोड़ सुख मिळेल
म्हणुन मला जाऊ दे ।

अखेरचे काही शब्द ,फक्त तुझ्यासाठी...
यापुढे मी कधी तुझी कुशी मागणार नाही .........!
कारण अखेरची शांत कुस
माय माउली धरणी माता
मला कुशीत सामावून घेईल ।।।
10
उद्या मृत्यू येईलच
माझ्या या नश्वर देहाला

उचलून नेतील खांद्यावर
चार जन मग प्रेताला

गर्दी तर खूपच जमलेली
असेल माझ्या क्रियेला

तरीही थोड थांबायला
सांगेल मी त्या यमाला

अन मरतांनाही चार ओळी
लिहून वाहील माझ्या प्रेमाला ....

11
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला सांगायच व कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!
Kisangawade.blogspot.com

12

मी वाट पाहतोय तुझी
आणि तुझ्या येणाऱ्या
त्या मिस कॉल ची
 मी वाट पाहतोय तू
 दिलेल्या प्रत्येक वचनांची
 ते केव्हा पूर्ण करशील
 मी वाट पाहतोय तू
 दिलेल्या प्रत्येक शब्दांची
तू ते अजुन देखिल पूर्ण
केले नाहीत ते अजुन अधुरेच आहेत
मी वाट पाहतोय मरणाची
 ते देखील तु आल्या शिवाय
 येणार नाही बोलतय
 मी वाट पाहतोय तुझ्या
त्या फोन ची
तो कधी येणार च नाही ?

13
अर्जुन मांजरेकर (शायर): मनात आले... !

मनात आले  बंद करावे डोळे ,
घ्यावा या जगाचा अंतिम निरोप !

का कुणासाठी एवढं झुरायचं !
का कुणात इतकं जीव गुतवायचं !
   
स्वताला यातना झाल्या तरी
रक्ताळलेल्या हातानं तिला गुलाब द्यायचं !
तिच्या चेहर्‍यावरील भावनाहीन
हास्याला आपल आत्मसुख मानायचं.
तिच्या एका शब्दाला वाटेल ते करायचं  !
वेळ पडली तर जीव द्यायचं ,
अरे असे फार झाले प्रेमी.!
हीर, रांझा, सलिम
व यात तुझा कितवा क्रमांक?

विचार तुझ्या भोळ्या हृदयाला !
विचार तुझ्या अतंरमनाला !
प्रेम हे
दिवा व परवान्याच्या नात्या प्रमाणं आहे !
ज्या दिव्याच्या ज्योतीवर
एक भेटीची आस घेऊन
परवाना तळमळतो,
   शेवटी काय, राख उरते नशिबी. !
तसेच तुझेही !
तिच्या बेवफाईने
अंधार्‍या कोपर्‍यात
डोळे ओले करायचे !

काय आहे हे प्रेम?
काय आहे या
प्रेम, हृदयांचे नाते?
ना कधी जाणले, ना कधी जाणवणार !
याच प्रेमात जीव जाणार,
एक इतिहास घडणार !
पुन्हा एक नवा जन्म घेणार,
एका नव्या प्रेमासाठी. !

14

तिची न माझी प्रेम कहाणी
अगदी विचीत्रच होती..

अस काही भेटलो होतो
जणु कधी वेगळ होणारच नाही..

आणि आता अस काही वेगळ
झालोय जणु एकमेकांना कधी
भेटलोच नाही.!

‪तिच्या बद्दल लिहायला शब्द‬
कमी नाय रे ‪भावनु माझ्याकडं‬ ।

फक्त ‎जिच्यासाठी लिहतो ना‬
‎तिचीच‬ कमी आहे.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा